Saved in:
Bibliographic Details
Main Authors: Professor (Dr.) Vinod R. Bansile, Principal (Dr.) Dnyaneshwar V. Gore, Eagle Leap Publication
Format: Recurso digital
Language:
Published: Zenodo 2026
Online Access:https://doi.org/10.5281/zenodo.19084772
Tags: Add Tag
No Tags, Be the first to tag this record!
Table of Contents:
  • <p><span lang="HI">भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा व समाजजीवनाचा कणा आहे. पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक शेतीला आता आधुनिकतेची आणि तंत्रज्ञानाची जोड मिळणे काळाची गरज बनली आहे. हरितक्रांतीपासून सुरू झालेला आपला प्रवास आता डिजिटल आणि तंत्रज्ञान-आधारित कृषी क्रांतीकडे वळला आहे. याच स्थित्यंतराचा आणि भविष्यातील दिशांचा वेध घेण्यासाठी </span><strong><span>"<span lang="HI">भारतामधील कृषी विकास: नवतंत्रज्ञान आणि व्यापक बदल"</span></span></strong><span lang="HI"> हे संपादित पुस्तक आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे.</span></p> <p><span lang="HI">या पुस्तकात कृषी क्षेत्रातील विविध अभ्यासक आणि संशोधक यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचे संकलन करण्यात आले आहे. यातून कृत्रिम बुद्धिमत्ता (</span><span>AI), <span lang="HI">इंटरनेट ऑफ थिंग्ज (</span>IoT), <span lang="HI">ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर</span>,<span lang="HI"> कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे या विषयीचे मार्गदर्शन, कृषी क्षेत्रातील नवीन सरकारी धोरणे</span>, <span lang="HI">पायाभूत सुविधांचा विकास आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, बदलत्या पर्यावरणात तग धरू शकणाऱ्या वाणांची निर्मिती आणि नव्या पद्धतीची माहिती, शेतमाल आयात व निर्यात आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणी व व्यापार ई. महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे पुस्तक केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून तयार केलेले नाही</span>, <span lang="HI">तर ते शेतकरी</span>, <span lang="HI">धोरणकर्ते</span>, <span lang="HI">कृषी-उद्योजक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी एक </span><strong><span>'<span lang="HI">मार्गदर्शक दस्तऐवज</span>'</span></strong> <span lang="HI">ठरावे हा यामागचा मुख्य हेतू आहे. </span></span></p> <p><span lang="HI">हे पुस्तक आकारास आणण्यात अनेक व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी संस्था अध्यक्ष आदरणीय राजे विजयसिंहजी जाधव साहेब यांनी दिलेल्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आदरणीय राजे साहेबांच्या मौल्यवान मार्गदर्शन आणि नैतिक पाठिंब्याशिवाय हे काम पूर्ण करणे खूप कठीण झाले असते.ज्या तज्ज्ञ लेखकांनी आपले बहुमोल विचार आणि संशोधन या पुस्तकासाठी दिले</span><span>, <span lang="HI">त्या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. तसेच</span>, <span lang="HI">हे पुस्तक वेळेत आणि उत्तमरीत्या वाचकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल प्रकाशकांचेही मी विशेष आभार मानतो.</span></span></p> <p><span lang="HI">या शैक्षणिक प्रवासाच्या शेवटी</span><span>, <span lang="HI">मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य तथा या पुस्तकाचे <strong>सह संपादक डॉ. ज्ञानेश्वर गोरे</strong> यांच्या सहकार्यासाठी व मार्गदर्शनासाठी त्यांचे तसेच संपादक मंडळाच्या सर्व आदरणीय सदस्यांचे</span>, <span lang="HI">महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि या पुस्तकाच्या पूर्णतेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो. </span></span></p> <p><span lang="HI">अखेरीस</span><span>, <span lang="HI">ऊन</span>, <span lang="HI">वारा</span>, <span lang="HI">पाऊस याची तमा न बाळगता काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या <strong><span>माझ्या बळीराजाला</span></strong> हे पुस्तक मी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो. हे पुस्तक कृषी क्षेत्रातील नव्या बदलांना समजून घेण्यासाठी आणि प्रगतीची नवी दारे खुली करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल</span>, <span lang="HI">असा मला विश्वास वाटतो.</span></span></p>